हरभरा खरेदी होणार

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर
हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून हेंक्टरी ११.२९ क्विंटल हरभरा खरेदी होणार
     राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या पाठपूराव्यानंतर राज्यशासनाने रब्बी हंगाम २०२० चा कापणी अहवाल स्विकारला असून त्यानुसार लातूर जिल्हयातील हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा ६.५० क्विंटल ऐवजी आता ११.२९ क्विंटल खरेदी केला जाणार आहे.
 या संदर्भातील अधिक माहिती अशी की, करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पाश्वभुमिवर अगोदरच लातूर जिल्हयात रब्बी हमीभाव केंद्र उशीराने सुरू झाले आहेत. त्यात शासनाने कृषी विभागाचा अंदाजित उत्पादन अहवाल ग्रहीत धरून प्रति हेंक्टर फक्त ६.५० क्विंटल हरभरा खरेदी करण्यास सुरूवात केली होती. प्रत्यक्षात यावर्षी हरभराचे हेक्टरी उत्पादन १० ते १५ क्विंटल पर्यंत झाले आहे. शेतकऱ्यांचा हरभरा पूर्णपणाने हमीभाव केंद्रावर स्विकारला जात नसल्यामुळे शेतकऱ्यामध्ये अस्वस्थता होती. लातूर जिल्हयात शेतकऱ्यांनी ही बाब पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या कानावर घातली होती. पालकमंत्री यांनी शेतकऱ्यांची तक्रार ऐकून घेतल्या नंतर सहकार तसेच कृषीमंत्री यांच्याशी बोलून यातनू मार्ग काढला जाईल असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. या दिलेल्या आश्वासनानुसार पालकमंत्री यांनी लातूर जिल्हयात सरासरी हेंक्टरी १०.६८ क्विंटल हरभराचे उत्पादन झाल्याचे शासनाच्या निर्दशनास आणून दिले व त्या पध्दतीने हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचा हरभरा स्विकारला जावा अशी मागणी संबंधित खात्याच्या मंत्रयाकडे केली होती. त्यांच्या सततच्या पाठपूरावा नंतर शासनाने सन २०१९-२० प्रतयक्ष कापणी अहवाल समोर ठेऊन्‍ लातूर जिल्हयात हेंक्टरी १०.२९ क्विंटल हरभरा खरेदी करण्याचा निर्णय जाहिर केला आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
शासनाच्या या निर्णयानुसार आता राज्यातील ठाणे ७.१, पालघर ७.२८, रायगड ४.१८, रत्नागिरी ४.७८, नाशिक ८.२१, धुळे १३.५, नंदूरबार ११.८१, जळगाव १२.६५, अहमदनगर ९.९०, पूणे ९.९, सोलापूर ७.१२, सातारा ९.३८, सांगली ७.८०, कोल्हापूर ९.१६, औरंगाबाद ९.६२, जालना १०.५८, बीड ११.५६, लातूर ११.२९, उस्मानाबाद ८.५, नांदेड १७.८, परभणी ८.६८, हिंगोली ९.८५, बुलढाणा १४.१२, अकोला १३.६, वाशीम ८.४७, अमरावती १४.४३, यवतमाळ १८.४२, वर्धा ९.२९, नागपूर १०.८५, भंडारा ६.१७, गोदिया ४.७७, चंद्रपूर ८.९९, गडचिरोली ४.२८ क्विंटल हरभरा खरेदी केंद्रावर स्विकारला जाणार आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..