किल्लारी येथे ०२ मार्च रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

किल्लारीत विशाल बौद्ध धम्म परीषदेचे आयोजन

             - पुज्य भंन्ते धम्मसार

निलंगा,दि.२६

मौजे किल्लारी ता औसा जिल्हा लातुर  येथे दि .०२ मार्च वार बुधवार रोजी  विशाल बौद्ध धम्म परीषद आयोजित करण्यात आली आहे, या धम्म परिषदेला जास्तीत जास्त  बौद्ध उपासक,उपसिकांनी उपस्थित रहावे आणि बुद्ध धम्माचे विचार ग्रहण करावेत असे आवाहन धम्म परीषदेचे संयोजक पुज्य भन्ते धम्मसार किल्लारी यांनी केले आहे.
विशाल अशी  ही धम्म परिषद जानेवारी महिन्यात ठेवण्यात आली होती, परंतु कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ती पुढे ढकलन्यात आली होती,परंतु आता ही धम्म परिषद ०२ मार्च रोजी घेतली जाणार आहे. 

या धम्म परिषदेस डॉ बाबासाहेब आंबेडकराचे पणतू व भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.राजरत्न आंबेडकर साहेब उपस्थित राहणार असून पूर्णा येथील जेष्ठ भिक्खु पुज्य भदंत डाॅ.ऊपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद पार पडणार आहे.
 या धम्म परीषेदेच्या स्वागत अध्यक्ष पदी किल्लारी ग्रामपंचायत चे सरपंच आयु. युवराज गायकवाड़ हे असनार आहेत.
नांदेड बिदर परभणी बिड औरंगाबाद, जालना, गुलबर्गा सोलापूर  लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात धम्म परिषदेचा  मोठया प्रमाणात प्रचार  व प्रसार करण्यात आला आहे. या धम्म परिषदेला चैत्ययभूमी ते दीक्षाभूमी आणि राज्यभरातील प्रत्येक ठिकाणचे १५ पेक्षा अधिक बौद्ध भिक्खु उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बुधवार दिनांक ०२  मार्च  रोजी सकाळी १० वाजता  भन्ते धम्मनाग महाथेरो हत्याळ यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होणार आहे,  दुपारी १२ वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे,  दुपारी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे तर दुपारी ०२ वाजता धम्म परिषदेला उपस्थित असलेल्या सर्व बौद्ध भिक्खु यांना चिवर दान करण्यात येणार आहे. पुज्य भन्ते यांची धम्म देसना दुपारी 3 वाजता होणार आहे,तर  प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन दुपारी ०३:३० वाजता होणार आहे. तर सायंकाळी ०५:३० वाजता या धम्म परिषदेचा समारोप होणार आहे या धम्म परीषदेस येताना सर्वांनी शुभ्र वस्र परीधान करुन यावे व शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करुण मास्क चा वापर करावा असे अवाहन पुज्य भन्ते धम्मसार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..