जी पॅट परीक्षेत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे घवघवीत यश
एप्रिल-२०२२ जी पॅट परीक्षेत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे घघवीत यश !
राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणा-या जी पॅट परीक्षेत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . यामध्ये शिंदे अक्षय, वडते नितिन, वसुरे प्रविन, गिरी अंजली, शिंदे भरत, आगलावे गायत्री, काटे लक्ष्मन, मुंडकर तिरुपती, स्वामी प्रतिक्षा, निकम तुकाराम, बरगे सतिष, माने नम्रता या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा महाष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर व सौ.वृशाली विजय पाटील निलंगेकर यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पदव्यूत्तर पदवी शिक्षणासाठी जी पॅट ही परीक्षा महत्वाची असुन ही परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच चांगल्या संस्थेत / महाविद्यालयात शिक्षणाची संधी लाभते. यावर्षी ही परीक्षा ९ एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आली होती. त्याचा निकाल दि.२०/०५/२०२२ रोजी जाहीर झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणारी जी पॅट परीक्षा बी.फार्मसी अंतीम वर्षाच्या विद्यार्थ्यासाठी असून, ही परीक्षा पास होणा-या विद्यार्थ्यांना एम.फार्मसीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मळिवता येतो व प्रवेशानंतर शासनाकडुन दरमहा स्टायफंडसुध्दा भेटते. तसेच जी पॅट परीक्षा पास होऊन एम.फार्मसी पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पी.एच.डी. साठी पेट ही परीक्षा द्यावी लागत नाही. त्यांना जी पॅटच्या स्कोअर नुसार पी.एच.डी. ला प्रवेश मिळतो.
जी पॅट परीक्षेसाठी बी.फार्मसी प्रथम ते अंतिम वर्षाच्या जवळपास सर्व विषयाचा अभ्यास असल्याने ही परीक्षा पास होण्यासाठी प्रथम वर्षापासून तयारी करावी लागते विद्यार्थ्यांनी आपले ध्येय प्रथम वर्षात असतानाच ठरविले व त्यात वेळेचे नियोजन व अभ्यास केला तर ही परीक्षा काहीच अवघड नसल्याचे मत प्राचार्य, डॉ. बी.एन.पौळ यांनी सांगितले. सत्कार समारंभ करतेवेळी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.एस. पाटील म्हणाले की महाविद्यालयात तृतिय आणि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांना त्या क्षेत्रात आवड आहे त्याच क्षेता्रतील त्यांचा कला गुणांना वाव देऊन त्यांचा व्यक्तिमत्व विकास केला जातो. महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांकडुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जात असल्याचे सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर साहेबांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, स्पर्धात्मक परीक्षा खुप कठीण होत चालल्या असुन, स्पर्धाही खुप वाढलेल्या आहेत त्यातच दर वर्षी आपल्या महाविद्यालयातून स्पर्धा परीक्षेत राष्ट्रीय पातळीवर सतत गुणवंत विद्यार्थी देणे ही खरोखरच कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment