शेडोळ येथे जातीयवादी गावगुंडांनी दगडाने शेत सालगड्याचे डोके फोडले..
जातीयवादी गावगुडांनी दगडाने शेत सालगड्याचे डोके फोडले...
निलंगा पोलिसात ऑट्रोसिटीचा गुन्हा दाखल...
मौजे शेडोळ तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील जातीयवादी गावगुंड नागनाथ तानाजी धुमाळ यांनी बौद्ध इसमाच्या डोक्यात दगड घालून जबर मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार दि.२० रोजी मंगळवारी घडला असून जखमी कचरू नरसिंग कांबळे (वय)५० वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगा पोलिस ठाण्यात नागनाथ तानाजी धुमाळ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ०२८०/२०२४ नुसार बी एन एस अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) बी एन एस अधिनियम २०२३ चे कलम ११५(२) बी एन एस अधिनियम २०२३ चे कलम ३५२ ,बी एन एस अधिनियम २०२३चे कलम ३५१(२),३५१(३) नुसार तर अनु जाती ,जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(r),३(१)(s),३(२)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर हे करीत आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, पिडीत कचरू नरसिंग कांबळे हे गावातच उत्तम बाबुराव धुमाळ यांच्या शेतात मागील ०६ वर्षापासून सालगडी गडी म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत.नेहमीप्रमाणे आपले शेतीतील काम करण्यासाठी पीडित कचरू कांबळे हे त्यांचा सहकारी तानाजी थोरमोठे यांना दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ०१ वाजेच्या सुमारास रामनगर शेडोळ येथून शेतिकामासाठी निघाले असता खंडू धुमाळ यांचे बंद असलेल्या हॉटेल समोर दुपारी ०१:३० वाजेच्या काहीच कारण नसताना ये म्हारग्या धेडग्या कुठे जात आहेस म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करू लागला विनाकारण शिवीगाळ का करता मला निट बोला असे म्हणाले असता तुला काय निट बोलायचे म्हणून हातात दगड घेऊन डोक्यात व कानापाठीमागे दगडाने . मारहान करून जबर जखमी केले व उचलून जमिनीवर व रोडवर जोराने आपटले, आदळले व लाथा बुक्याने जबर मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी गावातील काही लोकांनी सोडवा सोडव केली.जबर मार लागल्याने पीडित कचरू रक्ताच्या थारोळ्यात पडला या घटनेची माहिती त्यांची पत्नी व मुलीला मिळाली त्यांनी तत्काळ कचरू यास पुढील उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच निलंगा शहरातील विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी त्यात प्रामुख्याने गणराज्य संघाचे तालुका अध्यक्ष दत्ता भानुदास सूर्यवंशी,भीम आर्मीचे अतुल सोनकांबळे ,बहुजन समाज पार्टीचे दत्ता विश्वनाथ सूर्यवंशी ,जेष्ठ संपादक मोहन क्षिरसागर,राष्ट्रवादीचे धम्मानंद काळे, यांच्यासह अनेकांनी भेट देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी मागणी केली होती.
Comments
Post a Comment