निलंगा मतदारसंघाच्या विकासासाठी...

निलंगा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी निवडणूक लढवणार..

 - अभय साळुंके


निलंगा  मतदारसंघात अभय साळुंके यांना गावागावात उत्स्फूर्त प्रतिसाद...

निलंगा,दि.१४
 
निलंगा विधानसभा मतदारसंघात निवडणूकीचे वारे जोरात वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अश्यातच मतदारसंघात एका नावाची जोरदार चर्चा सुरू असून ते नाव म्हणजे अभय साळुंके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असून त्याच दृष्टीने मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे. गावागावात मतदारांचा वाढता कल त्यांना पाहायला मिळत आहे. निलंगा  मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी मी निवडणूक लढवणार असल्याचे अभय साळुंके यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

निलंगा मतदारसंघाची निवडणूक निर्णायक राहणार असून यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. निलंगा  मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जोपासत गेल्या  २५  वर्षापासून अभय साळुंके  मतदारांच्या अडीअडचणीला धावून आले आहेत. त्यामुळे अभय साळुंके यांचे मतदारांशी ऋणानुबंध जुळून आले आहेत. कोरोना काळातही जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला अविरत झोकून दिले होते. त्यासोबतच किराणा सामानांची किट गोरगरिबांना मोठया प्रमाणात उपलब्ध करून दिले होते. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल जनतेने आणि  काँग्रेस पक्षाने घेतली होती. फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांच्या अधीन राहून त्यांनी राजकारणाची वाट धरली असून गेल्या दोन – तीन महिन्यापासून निलंगा  मतदारसंघात तळ ठोकून जनतेच्या भेटी – गाठी घेत त्यांच्याशी संवाद साधत आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असो की सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरती, या सोबतच सर्वधर्मियांच्या उत्सवाला ते सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे भाषेवर प्रभुत्व, सखोल अभ्यास आणि मतदारांशी संवाद साधण्याची पद्धत यामुळे मतदारही त्यांना पसंती देत आहेत.

निलंगा मतदारसंघाचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार 

निलंगा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असून  मतदारसंघात जनतेची अवस्था काय आहे ? हे सर्वांना परिचित आहे.
निलंगा मतदारसंघात ‘एमआयडीसी’, उद्योगधंद्याची साधने नसल्यामुळे अनेक युवक बेरोजगार फिरत आहेत. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मतदारसंघातील अनेक विकासकामे रखडले आहेत. हे सर्व जिव्हाळ्याचे प्रश्न पूर्ण करण्यासाठी मतदारांच्या आशीर्वादाची मला गरज असून या निवडणुकीत ते मला निश्चितच आशीर्वाद देतील. अशी अपेक्षा अभय साळुंके यांनी व्यक्त केली. दरम्यान, निलंगा  मतदारसंघात निवडणुकीच्या अगोदरच राजकीय वातावरण तापले असून साळुंके यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे, हे मात्र निश्चित आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..