Posts

निलंगा नगरपालिका निवडणूक 2025 नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात..

Image
निलंगा नगरपालिका निवडणूक  नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात.. निलंगा,दि.21  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रशासन कार्यालय परिसरात प्रचंड गडबड, राजकीय हालचाली आणि अचानक घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि विविध पॅनेलचे प्रमुख यांनी तहसील कार्यालयाचा  रस्ता धरला. दिवसभर चाललेल्या चर्चांमुळे वातावरण तंग राहिले  अनेक उमेदवारांनी सकाळ पासूनच  अर्ज माघार घेणार असल्याचा लेखी अर्ज दाखल केले.तर काहींनी दुपारी अचानक निर्णय घेतला. काही उमेदवारांनी माघारीवर अधिकृत भूमिका मांडण्यास नकार दिल्याने “वरिष्ठांचे आदेश”, “गोपनीय समझोता”, “शेवटच्या क्षणी झालेली बैठक” अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडाळी थांबवण्यासाठी वरिष्ठांनी थेट फोनवरून आदेश देऊन उमेदवारांना नामनिर्देशन माघार घ्यायला भाग पाडल्याचे समजते. तर काही ठिकाणी गैरसमज, अंतर्गत नाराजी आणि पॅनेलचे तडजोडीचे राजकारण ठळक...

Bhima Army’s Storm in Nilanga — A Resounding Call for the Constitution, Equality, and Self-Respect!

Image
Bhima Army’s Storm in Nilanga — A Resounding Call for the Constitution, Equality, and Self-Respect! Branch inaugurations at Chandori, Chincholi (S), Badur, and Kelgaon — A new direction for the struggle of social justice emerging from Marathwada. Latur, Oct. 24( Milind Kamble) Spreading the ideology of Dr. Babasaheb Ambedkar and rekindling the flame of social equality, the Bhima Army’s storm has now begun sweeping across Nilanga taluka. On Friday, October 24, 2025, this historic event is set to unfold, marking the beginning of a new chapter of social justice, self-respect, and organizational strength in the Marathwada region. The event will be graced by Marathwada Inspector Akshay Dhaware, former Marathwada President Vinod Kolhe, District President Vilas Chakre, and National Secretary Yashpal Bore. Under their guidance, the movement aims to unite the deprived, oppressed, and marginalized sections of society and to strengthen the fight for equality in accordance with the principles of t...

निलंग्यात भीम आर्मीचा झंझावात..

Image
निलंग्यात भीम आर्मीचा झंझावात.. संविधान, समता आणि स्वाभिमानाचा बुलंद नारा! चांदोरी, चिंचोली (स), बडुर आणि केळगाव येथे शाखांचे अनावरण — मराठवाड्यातून सामाजिक न्यायाच्या नवसंघर्षाची दिशा! लातूर,दि.२४(मिलिंद कांबळे) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रसार आणि सामाजिक समतेचा दीप पुन्हा उजळवत भीम आर्मीचा झंझावात आता निलंगा तालुक्यात सुरू झाला आहे. दि. २४ ऑक्टोबर २०२५, शुक्रवार या दिवशी हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार असून, मराठवाड्याच्या भूमीतून सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि संघटनशक्तीचा नवा पर्व उलगडत आहे. या कार्यक्रमास मराठवाडा निरीक्षक अक्षय धावरे, माजी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे, जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे आणि राष्ट्रीय सचिव यशपाल बोरे हे मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील वंचित, शोषित आणि वगळलेल्या घटकांना एकत्र आणण्याचा, तसेच संविधानाच्या तत्त्वांनुसार समानतेचा लढा अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. निलंगा तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली व तालुका पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने चांदोरी, चिंचोली (स), बडुर आणि केळगाव या ...

शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार.. दास (भैय्या) साळुंके

Image
शेतकऱ्यांना अनुदान न मिळाल्यास उग्र आंदोलन करणार.. दास (भैय्या) साळुंके यांचा इशारा... लातूर,दि.२२(मिलिंद कांबळे) निलंगा तालुक्यातील शेतकरी वर्गाला अजूनही शासनाचे अनुदान मिळालेले नसल्याने अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेने आज “चटणी-भाकरी आंदोलन” करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. संघटनेचे निलंगा तालुकाध्यक्ष दास (भैय्या) साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी संघटनेचे कार्यकर्ते, स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदार निलंगा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दिलेली आश्वासने केवळ कागदावरच राहिली आहेत.  शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे दिवाळीसारख्या सणातही शेतकरी हातावर हात ठेवून बसला आहे.” यावेळी दास साळुंके यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जर पुढील आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही, तर आम्ही निलंगा तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन करणार आहोत. शासनाने शेतकऱ्यांचा संयम तपासू नये.” संघटनेचे केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष ...

सुमन डावळे (गायकवाड) राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...

Image
सुमन डावळे (गायकवाड)  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित... लातूर,दि.०७(मिलिंद कांबळे) सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रेरणादीप" राज्यस्तरीय पुरस्कार 2025 "समाजज्योती" पुरस्कार देवून सुमन गायकवाड यांना  नांदेड येथे सन्मानित करण्यात आले. सुमन डावळे (गायकवाड), लातूर हे प्रामाणिक, निर्भीड सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लोकांचे प्रश्न, समस्या जाणून  आपल्या कार्यातून त्यांच्यासाठी आवाज उठवणे प्रश्न कसे मार्गी लागतील हे पाहतात. सुमनजी या सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजहित हेच राष्ट्रहित समजून वृक्षारोपन, जनजागृती स्वतः त्यांनी अनेक वेळेस रक्तदान देवून अनेकांचे जीव वाचवण्याचे कार्य केले आहे. त्याबाबत राज्यस्तरीय पुरस्काराने सुमनजी यांचे कौतुक करून सन्मान केला आहे.  मान नेतृत्वावाचा सन्मान कर्तृत्वाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रेरणादीप समाजज्योती पुरस्कार देण्यात आला. यावेळी पद्माकर सावंत, सुचना तालुका प्रमुख, नांदेड द...

निलंगा तालुक्यातील हाडगा येथील पुरग्रस्त शेतकऱ्याची स्वहत्या..

Image
निलंगा तालुक्यातील  हाडगा येथील पुरग्रस्त शेतकऱ्याची स्वहत्या... लातूर,दि.०४(मिलिंद कांबळे) ओढ्या काठच्या जमीनीत पुराचे पाणी शिरुन संपूर्ण खरीप हंगामातील पिकाची नासाडी झाल्याने आर्थिक विवंचनेतून तालुक्यातील हाडगा येथील शेतकरी मधूकर सोपान वाघमारे या शेतकऱ्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना शनिवार (दि ४) रोजी सकाळी नऊ वाजता घडली. निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभूधारक शेतकरी मधूकर सोपान वाघमारे वय ६५ वर्ष यांची गावच्या शेजारीच ओढ्याच्या काठावर जमीन असून मागच्या एक महिन्यापासून सततच्या मुसळधार पावसाने त्यांच्या शेतात पाणी शिरुन खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघणार नसल्याने आर्थिक विवंचनेत ते मागच्या आठ दिवसापासून बेचैन झाले होते. त्यातच त्यांनी शनिवारी सकाळी नऊ वाजता स्वतःच्या घरात विष प्राशन केले. तात्काळ त्यांना निलंगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली होती. शवविच्छेदनानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. घटनेची माहिती तंटामुक्...

लातूर येथे भव्य धम्मदिक्षा सोहळा संपन्न...

Image
लातूर येथे भव्य धम्म दीक्षा सोहळा संपन्न लातूर,दि.03(मिलिंद कांबळे) भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर(प) तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, लातूर च्या संयुक्त विद्यमाने धम्म चक्र अनुवर्तन दिनाच्या निमित्ताने भव्य धम्म दीक्षा सोहळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क,लातूर येथे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात अधिकृत नोंदी करणाऱ्या १३५ नवदीक्षितांना भारतीय बौद्ध महासभेकडून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  या धम्म दीक्षा सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा आशाताई चिकटे होत्या. तसेच मंचावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर 134 व्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे स्वागत अध्यक्ष डॉ. विजय अजनीकर सह भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.        बुद्ध, बाबासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करुन त्रिसरण पंचशील देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या प्रास्ताविकातून जिल्हा उपाध्यक्ष गौतम बनसोडे यांनी उपस्थितांना बाबासाहेबांनी आपल्याला १९५६ साली धम्म दिला. त्यामुळे आपण जन्माने बौद्ध होत नाही त्यासाठी धम्माची वि...