डॉ.बाबासाहेबांनी धम्माचा बोधी वृक्ष लावला त्याचे जतन करण्याची जवाबदारी आपल्या सर्वांची आहे.. भंते उपगुप्त महाथेरो लातूर,दि.१८(मिलिंद कांबळे) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांसाठी धम्माचा महान असा बोधी वृक्ष लावला आहे. त्या बोधी वृक्षाला खत पाणी घालून त्याला वाढवणे त्याचा प्रचार,प्रसार करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.असे प्रतिपादन भंते उपगुप्त महाथेरो यांनी केले. ते लातुर जिल्ह्यातील ऐतिहासिक बुद्ध लेणी परिसर खरोसा येथील श्रावस्ती बुद्ध विहारावर भंते सुमेधजी नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षावास महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी थायलंड, कम्बोडीयां, व्हिएतनाम येथील अनेक भंतेगण उपस्थित होते. यावेळी देशाबाहेरील भंतेगण भारतात का आले व त्यांना आपल्या देशात कोणी आणले आहे.याबद्दल ची माहीती देण्यात आली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,भंते सुमेधजी नागसेन यांनी या भागात धम्माची प्रगती केलेली आहे. पण त्यांना आपण सर्वांनी तन- मन आणि धनाने दान केले पाहिजे आपण दान केले तरच हे सर्व मंगल कार्य...
Comments
Post a Comment