शिरूर अनंतपाळ तालुक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू

शिरूरअनंतपाळ तालूक्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यु
निलंगा :दि२५(मिलिंद कांबळे)

शिरूरअनंतपाळ तालूक्यातील मौजे शेंद दक्षिण येथील शेतीत काम करित असताना सालगडी गौतम कांबळे ३४ व मालकाचा मूलगा अभिजीत मोरे १९ यांच्या अंगावर वीज पडुण दोघांचा जागीच मृत्यु झाला. हि घठणा गुरुवारी सांयकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली .
        तालूक्यातील शेंद दक्षिण येथे गुरूवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक काळे ढग जमा झाले त्यांनतर पाऊस सुरु झाला त्यामुळे शेतात काम करणारा सालगडी गौतम कांबळे व मालकाचा मुलगा अभिजीत मोरे हे आंब्याच्या झाडाखाली थांबले असता  विजेच्या कडकडाट होऊन वीज झाडावर कोसळली त्यातच दोघांचाही जाग्यावर मृत्यु झाला . सालगडी गौतम याच्या पश्चात आई वडील पत्नी दोन लहान मूली असुन पत्नी आठ महिण्याची गरोदर आहे .तर अभिजीत हा पुणे येथे फोर व्हिलर गाडीचा मेकाॅनीक म्हणुन काम शिकत होता. तो लाॅकडाऊन असल्याने तीन महिण्यापासुण गावी आला होता. व आईवडीलांना शेतीकामात मदत करण्यासाठी शेतात गेला होता. त्यांच्या मृत्यु मूळे शेंद येथे हळहळ व्यक्त केली जात आहे .
   तलाटी सदानंद सोमवंशी व मंडळ अधिकारी डोंगरे यांनी घठणास्थळी जाऊन पंचनामा केला असल्याची माहीती तहसिलदार अतुल जटाळे यांनी दिली.

निलंगा: मिलिंद कांबळे
मो 9960049411
मो 8626000526

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..