संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट..

निलंग्यातील संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानी घेतली जरांगे पाटलांची भेट....

मराठा ओबीसीकरण आरक्षनाची तीव्रता अधिक वाढणार -मानोजदादा जरांगे पाटील 

निलंगा/प्रतिनीधी

अंतरवाली सराटी येथे ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी महाराष्ट्र हलवला,जागवला ते मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी निलंगा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळांनी भेट घेतली व मनोज जरांगे पाटलांना विनंती केले...
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षण/फीस मोफात झाली पाहिजे. कंत्राटी पद्धतीने होत असलेली भरती प्रक्रिया थांबली पाहिजे. शाळा महाविद्यालये, दवाखाने यांचे खाजगीकरण थांबले पाहिजे. 
या मागणीचा आग्रह मनोज जरांगे पाटील यांच्या समोर धरला. व संभाजी ब्रिगेड निलंगा, लातुर जिल्हा व यांच्या वतीने पाठिंबा दिला.मनोज जरांगे पाटलांना रोज लाखो लोक येऊन भेटत आहेत प्रत्येकाला बोलणे चालू आहे. संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम हे निलंगा येथे झालेल्या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली व आम्ही तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे निलंगा तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, शहराध्यक्ष परमेश्वर बोधले, तालुका सहसचिव कुणाल पाटील, संघटक परमेश्वर नांगरे पाटील, अमोल माने यांच्यासह प्रमूख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..