भीषण अपघातात निलंगा तालुक्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू..
**भीषण अपघातात निलंगा तालुक्यातील दोन अविवाहित तरुणांचा दुर्दैवी मृत्यू… शिऊर व गौर गावांवर शोककळा; यात्रेच्या आनंदावर काळाचा घाव** लातूर,दि.०५ (मिलिंद कांबळे) निलंगा तालुक्यातील कवठा पाटी ते तुपडी दरम्यान आज दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना दोन कुटुंबांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करून गेली. यात्रेच्या आनंदाने, आप्तस्वकीयांना भेटण्याच्या ओढीने निघालेला प्रवास असा अचानक मृत्यूच्या दारात संपेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण धडक… आणि एका क्षणात दोन तरुणांचे प्राण हिरावले गेले. मागे उरले ते फक्त अश्रू, हंबरडा आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी… या भीषण अपघातात शिऊर येथील सोहेल रहीम शेख (वय २२, अविवाहित) यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर गौर येथील अमर सुनील देशमुख (वय ३२, व्यवसाय – शेती, अविवाहित) यांना उपचारासाठी नेत असताना अखेरचा श्वास घेतला. या दुहेरी मृत्यूने शिऊर आणि गौर या दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून प्रत्येक घरात दुःखाचे सावट दाटून आले आहे. सोहेल… घरचा एकुलता एक मुलगा… आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न… लहान बहिणीचा आधार… अत्यंत साध्या परिस्थि...