Posts

भीषण अपघातात निलंगा तालुक्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू..

Image
**भीषण अपघातात निलंगा तालुक्यातील दोन अविवाहित तरुणांचा दुर्दैवी मृत्यू… शिऊर व गौर गावांवर शोककळा; यात्रेच्या आनंदावर काळाचा घाव** लातूर,दि.०५ (मिलिंद कांबळे) निलंगा तालुक्यातील कवठा पाटी ते तुपडी दरम्यान आज दुपारी घडलेली एक हृदयद्रावक घटना दोन कुटुंबांचे आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करून गेली. यात्रेच्या आनंदाने, आप्तस्वकीयांना भेटण्याच्या ओढीने निघालेला प्रवास असा अचानक मृत्यूच्या दारात संपेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर झालेली भीषण धडक… आणि एका क्षणात दोन तरुणांचे प्राण हिरावले गेले. मागे उरले ते फक्त अश्रू, हंबरडा आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी… या भीषण अपघातात शिऊर येथील सोहेल रहीम शेख (वय २२, अविवाहित) यांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला, तर गौर येथील अमर सुनील देशमुख (वय ३२, व्यवसाय – शेती, अविवाहित) यांना उपचारासाठी नेत असताना अखेरचा श्वास घेतला. या दुहेरी मृत्यूने शिऊर आणि गौर या दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून प्रत्येक घरात दुःखाचे सावट दाटून आले आहे. सोहेल… घरचा एकुलता एक मुलगा… आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्न… लहान बहिणीचा आधार… अत्यंत साध्या परिस्थि...

शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..

Image
शेषेराव (तात्या) कांबळे यांचे निधन.. आंबेडकरी चळवळीचा आधारवड हरपला.. निलंगा, दि.०५   निलंगा शहरातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष श्री. शेषेराव (तात्या) कांबळे (वय  ८० वर्षे, रा. मिलिंद नगर, निलंगा) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने निलंगा शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. तात्या हे नाव निलंग्यात केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हते, तर ते विश्वास, माणुसकी आणि नात्यांची उब यांचे प्रतीक होते. आंबेडकरी चळवळीशी त्यांची नाळ अतूटपणे जोडलेली होती. त्यांनी आयुष्यभर चळवळीचे मूल्य जपत समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी झटत राहिले.“चळवळीची ओढ आणि राजकारण यांच्या पलिकडचे नाते” त्यांनी आपल्या आयुष्यभर जपले आणि तेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य ठरले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात रिपब्लिकन पार्टी (गवई गट) मधून केली. त्यानंतर आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सहा दशके प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्ता ...

कोणताबाई सोनकांबळे यांचे निधन..

Image
कोणताबाई सोनकांबळे यांचे निधन वंचितचे कट्टर कार्यकर्ते प्रदीपभाऊ सोनकांबळे यांच्या माता कोणताबाई सोनकांबळे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी निलंगा,दि.२४ वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते प्रदीपभाऊ सोनकांबळे यांच्या मातोश्री कोनताबाई भानुदास सोनकांबळे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनकांबळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. साधेपणा, कष्ट आणि मूल्यांवर आधारलेले त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. कठीण परिस्थितीतही कुटुंबाला आधार देत त्यांनी सामाजिक जाणीव जपली. त्यांच्या संस्कारातूनच प्रदीपभाऊ सोनकांबळे यांची सामाजिक आणि राजकीय जडणघडण झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अशोकनगर स्मशानभूमी, निलंगा, जिल्हा लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बाबा आढाव काळाच्या पडद्याआड..श्रमिक, शेतकरी आणि असंघटित कामगारांचा आधार हरपला..

Image
बाबा आढाव काळाच्या पडद्याआड.. श्रमिक, शेतकरी आणि असंघटित कामगारांचा थोर आधार हरपला.. लातूर, दि. ०९ श्रमिक, कष्टकरी, शेतकरी आणि असंघटित कामगारांसाठी आयुष्यभर झुंजणाऱ्या बाबा आढाव यांचे निधन झाल्याने संपूर्ण समाज शोकाकुल झाला आहे. जनसामान्यांचा आवाज, न्यायासाठी सतत लढणारे, समाजातील पीडितांसाठी कायमच धावणारे थोर व्यक्तिमत्त्व आता फक्त आठवणींच्या पानावर राहिले आहे. बाबा आढाव हे फक्त नेता नव्हते, तर चळवळींच्या प्रतीक, न्यायप्रियतेचे मूर्त स्वरूप होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली “कष्टाची भाकर”, “एक गाव एक पाणवठा”, “हमाल पंचायत” अशा अनेक सामाजिक आंदोलनांनी आकार घेतला. प्रत्येक कृतीत त्यांनी मानवी संवेदना, सहानुभूती आणि प्रामाणिकपणा राखला, जे त्यांच्या नेतृत्वाची खरी ताकद होती. बाबा आढाव यांनी श्रमिक व कामगार समाजासाठी असंख्य आंदोलनांना नेतृत्व केले, पीडितांचा आवाज बुलंद केला आणि स्थानिक व राष्ट्रीय स्तरावर न्याय मिळवून दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक असंघटित कामगार संघटित झाले, गावकऱ्यांचे पाणीप्रवाह सुरळीत झाला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली. त्यांची व्यक्तिमत्त्व इतकी उदात्त होती ...

माधवराव बोयणे यांचे निधन...

Image
माधवराव बोयणे यांचे निधन.. शिक्षण क्षेत्रासह समाजकार्याची परंपरा जपणाऱ्या कुटुंबावर शोककळा.. निलंगा, दि. २७ निलंगा तालुक्यातील शेळगी येथील प्रगल्भ व्यक्तिमत्त्व, माजी सैनिक माधवराव झटिंगराव बोयणे  यांचे वृद्धापकाळाने आज सायंकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने बोयणे घराण्यात तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. स्व. माधवराव बोयणे यांनी दीर्घकाळ देशसेवा केली होती. सैन्य जीवनातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी आयुष्यभर जपली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सौम्यता, मनमिळाऊ स्वभाव आणि समाजातील प्रत्येक घटकाबद्दल आदरभाव दिसून येत असे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ अनेकांना झाला. त्यांच्या शिक्षणप्रेमी कुटुंबाने समाजात वेगळा ठसा उमटवला आहे. ते केंद्रीय प्राथमिक शाळा औराद (श) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रा. बालाजी बोयणे, दापका (भ) येथील मुख्याध्यापक तानाजी बोयणे, तसेच सावित्रीबाई फुले निवासी आश्रमशाळा औराद (श) येथील मुख्याध्यापक शिवाजी बोयणे यांचे वडील होत. शिक्षण क्षेत्रातील ही तिन्हीही मंडळी तालुक्यात नावाजलेली आहेत. त्याशिवाय चिंचोली (भं) येथील सहशिक्षिका सौ. स...

निलंगा नगरपालिका निवडणूक 2025 नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात..

Image
निलंगा नगरपालिका निवडणूक  नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार  निवडणुकीच्या रिंगणात.. निलंगा,दि.21  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रशासन कार्यालय परिसरात प्रचंड गडबड, राजकीय हालचाली आणि अचानक घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि विविध पॅनेलचे प्रमुख यांनी तहसील कार्यालयाचा  रस्ता धरला. दिवसभर चाललेल्या चर्चांमुळे वातावरण तंग राहिले  अनेक उमेदवारांनी सकाळ पासूनच  अर्ज माघार घेणार असल्याचा लेखी अर्ज दाखल केले.तर काहींनी दुपारी अचानक निर्णय घेतला. काही उमेदवारांनी माघारीवर अधिकृत भूमिका मांडण्यास नकार दिल्याने “वरिष्ठांचे आदेश”, “गोपनीय समझोता”, “शेवटच्या क्षणी झालेली बैठक” अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडाळी थांबवण्यासाठी वरिष्ठांनी थेट फोनवरून आदेश देऊन उमेदवारांना नामनिर्देशन माघार घ्यायला भाग पाडल्याचे समजते. तर काही ठिकाणी गैरसमज, अंतर्गत नाराजी आणि पॅनेलचे तडजोडीचे राजकारण ठळक...

Bhima Army’s Storm in Nilanga — A Resounding Call for the Constitution, Equality, and Self-Respect!

Image
Bhima Army’s Storm in Nilanga — A Resounding Call for the Constitution, Equality, and Self-Respect! Branch inaugurations at Chandori, Chincholi (S), Badur, and Kelgaon — A new direction for the struggle of social justice emerging from Marathwada. Latur, Oct. 24( Milind Kamble) Spreading the ideology of Dr. Babasaheb Ambedkar and rekindling the flame of social equality, the Bhima Army’s storm has now begun sweeping across Nilanga taluka. On Friday, October 24, 2025, this historic event is set to unfold, marking the beginning of a new chapter of social justice, self-respect, and organizational strength in the Marathwada region. The event will be graced by Marathwada Inspector Akshay Dhaware, former Marathwada President Vinod Kolhe, District President Vilas Chakre, and National Secretary Yashpal Bore. Under their guidance, the movement aims to unite the deprived, oppressed, and marginalized sections of society and to strengthen the fight for equality in accordance with the principles of t...